Skip to main content

Posts

खरचं, मी पर्यावरणवादी?

                 खरचं, मी पर्यावरणवादी?                     जेव्हा गांधीजींचा एक प्रसंग माझ्या वाचनामध्ये आला.जेव्हा गांधीजी  प्रयाग येथील काँग्रेसच्या संमेलनामध्ये असताना पाण्याने हात धुत होते, तेव्हा कार्यकर्त्यांबरोबर बोलण्यात गर्क झाल्याने जास्त पाणी हातावर ओतले गेले. ते जरी अनवधानाने घडले असले तरी जास्त पाणी वाया गेल्याचे त्यांना वाईट वाटू लागले .तेवढ्यात जवाहरलालजी म्हणाले,"आपण तर गंगा-यमुनेच्या काठावर आहोत आणि पाण्याची काय कमतरता आहे.थोडे जास्त पाणी वाया गेले म्हणून कुठं बिघडलं? म.गांधीजी म्हणाले कि ,"गंगेचे पाणी सर्वांसाठी आहे, पशू,पाखरे, कीटक.. माझ्याकडून  अनवधानाने जरी जास्त पाणी वाया गेले असले तरी  मी कोणाच्या तरी वाटचा हिस्सा हिसकवला  आहे. या प्रसंगातून मला एक जाणवलं कि, आपण सकाळ पासून किती पाणी वाया घालवत असतो. शौचालयाला गेलो तरी कमीतकमी लहान दोन बादली पाणी वापरतो. तसेच स्नानासाठी गेल्यावर कमीत कमी तीन  मोठी बादली पाणी वापरतो. शौचालयातील फ्लशचा आणि स्नानगृ...
Recent posts

काय आहेत CAA आणि NRC?? का एवढे गैरसमज पसरवले जातं आहेत??

                आज देशभर CAA(Citizenship Amendment Act) च्या नावाने गोंधळ माजवला जात आहे. तर काय आहे हा नागरिकत्व दुरुस्ती कायदा!! काही दिवसांपूर्वी हे (Citizenship Amendment Bill) विधेयक  लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बहुमताने पारित झालं. तद्नंतर 12 डिसेंबर 2019 ला राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने ह्या विधेयकाला मंजुरी मिळाली आणि पक्कं झालं कि, हा कायदा आता लागू होणार तेव्हा पासून देशामध्ये  वेगवेगळ्या  काँग्रेस च्या नेत्यांनी जाहीर भाषणे केली. हा कायदा देशामध्ये तुष्टीकरण करत आहे . तसेच हा कायदा विशिष्ट एका धर्माच्या विरुद्ध आहे असं वातावरण काँग्रेस, कम्युनिस्ट,TMC MIM, तसेच वेगवेगळ्या डाव्या विचाराच्या  विद्यार्थी संघटनांनी  इ. वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली. भारतीय नागरिकांना तळागाळापर्यंत समजेपर्यंत  खूप गैरसमज देशभर हेतुपुरस्सर  जाणूनबुजून पसरवले गेले.          त्यामुळे देशभर  आंदोलनाला हिंसक वळण मिळालं. हे हिंसक आंदोलन   लवकरच आसाम, पश्चिम बंगाल  आणि तसेच देशातील क...

हिंदू, हिंदुत्व, हिंदुराष्ट्र

स्वा. सावरकरांच्या व्याख्येनुसार जो या देशाला भूमीला पुण्यभूमी आणि पितृभूमी मानतो तो हिंदू! सावरकारांच्या व्याख्येनुसार, तर जो जो या देशांमध्ये राहतो मग तो कोणत्याही संप्रदायाचा असो(इस्लाम, ख्रिश्चन, ज्यू, पारसी) या देशाला पुण्यभूमी आणि पितृभूमी मानत असतील तर तेे सर्व हिंदू आहेत.या देशाला वेगवेगळी नाव आहेत भारत,इंडिया, हिंदुस्थान असे. राजा दुष्यांत आणि शकुंतला चे पुत्र भरत नावाचा पराक्रमी राजा होऊन गेला त्यांच्यावरून नावावरून या भूमीला 'भारत 'असे नाव पडले. इंडस(सिंधू खोरे) याच्या वरून या भूमीला 'इंडिया' असे पाश्चातानी नाव दिले.आता राहिला विषय जो नेहमी हिंदू ह्या शब्दांची उत्पत्ती कशी झाली... याचा उल्लेख तर वेद, उपनिषदामध्ये तर नाही मग याचा उगम कसा झाला तर जेव्हा इराणी लोक वायव्ये कडून भारतामध्ये व्यापाराच्या निमित्त येत असत तेव्हा त्यांनी सिंधूचा उल्लेख हिंदू  असा  करत कारण इराणी(पारसी )भाषेमध्ये 'स' चा उच्चार 'ह' असा होतो. इराणी लोक सिंधू नदीच्या खोऱ्यात बहरलेल्या सिंधू संस्कृतीला हिंदू संस्कृती म्हणत.इराणींकडून हे नाव अरबांकडे पोहचले असे हे नाव जग...

शहरी नक्षलवाद

           प.बंगालमधील नक्षलबाडी   येथून चालू झालेली जमीनदारांच्या विरोधातील हि चळवळ आज भारतातील मोठ्यामोठ्या शहरांच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या रूपांमध्ये पोहचली आहे. प्रथमतः  मुझुमदार, सन्याल यांनी ही चळवळ भूदास, शेतमजूर यांच्यासाठी जमीनदाराच्या विरुद्ध सशस्त्र क्रांतीचा  मार्ग अवलंबला. सुरूवातीला हि चळवळ जमीनदारांच्या जमीनी बळकावून भूदास,शेतमजूर, शोषित यांच्या मध्ये वाटण्यात आली  आणि नक्षलवादी चळवळ काही अंशी यशस्वी झाली. नंतर हि खूप प्रसिद्ध झाली याच्यातूनच आदिवासी, भूदास, शेतमजूर, शोषित , वंचित असे समाजातील वेगवेगळे गटातील लोक नक्षलवादी चळवळीला जोडत गेले. हि चळवळ झपाट्याने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचली.  जंगल, जमीन,जल याच्या साठी आपण लढत आहोत असे नक्षलवादी नेतृत्वाने बिंबवण्यास सुरुवात केली.याच्यातूनच मग विकासाला विरोध, राजकीय लोकांची हत्या, प्रशासनाच्या कामांमध्ये अडथळे निर्माण करण्यासारखे गोष्टी घडू लागले, पोलीस दलावर गोळीबार करणे असे सातत्याने घडू लागले. हि चळवळ अशाप्रकारे पश्चिम बंगाल, झारखंड,मध्यप्रदेश, छत्तीसगढ, महाराष्...

काश्मिर प्रश्न

         ज्या भूमीला प्राचीन काळापासून पृथ्वीवरील स्वर्ग म्हणायचे त्याला आता नरकात रूपांतर करण्यामध्ये  पाकिस्तान, दहशतवादी, अलगाववादी , हुर्रियत नेत्यांनी कोणतीही  कसर ठेवली नाही; तसेच कट्टर जिहादी गटाने त्याला धार्मिक स्वरूप देवून त्या विषयाला  धगधगत ठेवण्यामध्ये  यांचा प्रामुख्याने हात आहे.            काश्मिरचा विषय नेहमी कोणत्या ना कोणत्या विषयामुळे  चर्चेत असतो. मग तो सामाजिक, राजकीय,   भौगोलिक,धार्मिक असो किंवा दहशतवादी  ह्या विषयामुळे काश्मिरचा प्रश्न  नेहमी धगधगत असतो.  हा प्रश्न प्रामुख्याने निर्माण झाला तो स्वातंत्रोत्तर भारतानंतर, ज्यावेळेस ब्रिटिशांनी भारतातील संस्थानिकांना  एक तर तुम्ही भारत किंवा पाकिस्तानमध्ये विलीन व्हा किंवा  किंवा स्वतंत्र रहा असे सुचवले. ह्या ब्रिटिशांच्या निर्णयानंतर काश्मीरच्या राजा हरिसिंग ने काश्मीर संस्थानिक स्वतंत्र ठेवण्याचा निर्णय घेतला;त्याप्रमाणे काश्मीर राज्य स्वतंत्र राहीले .तिथे राजा हिंदू तर बहुसंख्याक जनता मुस्लिम होती, तसेच...

इतिहासाचे डावे वळण

जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय मधील इतिहास संशोधन केंद्राचे अध्यक्ष तसेच दिवंगत  प्राध्यापक बिपीन चंद्र यांचे ' आधुनिक भारत का इतिहास' या पुस्तकामध्ये  क्रांतिकारकांना, आतंकवादी असा शब्दप्रयोग केला आहे. तसेच   महात्मा गांधीजींची हत्या करणाऱ्यांचा हिंदू कट्टरपंथी असा उल्लेख केला आहे. अबुल कलाम आझाद राष्ट्रवादी तर भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त मात्र आतंकवादी  असा पक्षपाती शब्दप्रयोग का? हे पुस्तक साधसुधं नाही , या पुस्तकाचा उपयोग संघ लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व अखिल भारतीय सेवांच्या परीक्षेचा  अभ्यास करणारे जवळजवळ सर्व विद्यार्थी ह्या पुस्तकाचा उपयोग पाठ्यपुस्तकासारखा करतात. हे पुस्तक लोकशाहीमधील महत्त्वाचा स्तंभ समजला जाणारा नोकरशाही मधील जबाबदारीच्या व्यक्तींचा बौद्धिक खुराक आहे. थोडा विचार करण्यासारखा आहे!!!

केरळची आपत्ती नैसर्गिक की मानवनिर्मित?

‌           समुद्र आणि जंगल यांच्या मध्ये असलेलं चिंचोळ राज्य म्हणजे 'केरळ'. दक्षिणेकडील राज्यांपैकी एक राज्य,  हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन अशी संमिश्र धार्मिक  लोकजीवन  प्रणाली असलेलं राज्य!  केरळ एक तर राजकीय किंवा धार्मिक कारणांनी  होणाऱ्या हत्त्येसाठी नेहमी चर्चेत असतो, सध्या केरळ  जलप्रलयच्या बातम्यांनी चर्चेत आहे. ‌              केरळ हे पश्चिम घाटावर येणार राज्य, नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध त्यामुळे साहजिकच 'खाण' आणि 'पर्यटन' व्यवसायांचा मोठयाप्रमाणावर विकास झाला  आणि याच्यातूनच केरळ सरकारला मोठयाप्रमाणावर उत्पन्न मिळत आहे. त्यातच ह्या केरळसरकारने जैवविविधतेने समृद्ध असल्याने तसेच पर्यटनस्थळांचा विकास याच्यातून अनेक नवीन कृत्रिम बंधारे विकसित केले नि नवीन पर्यटनस्थळे विकसित केले.तसेच हे राज्य नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असल्याने 'खाण'विकास आणि उत्खनन हि या राज्यामध्ये मोठ्याप्रमाणावर झाल.      ‌                पश्चिमघाटवरील...