Skip to main content

केरळची आपत्ती नैसर्गिक की मानवनिर्मित?


‌           समुद्र आणि जंगल यांच्या मध्ये असलेलं चिंचोळ राज्य म्हणजे 'केरळ'. दक्षिणेकडील राज्यांपैकी एक राज्य,  हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन अशी संमिश्र धार्मिक  लोकजीवन  प्रणाली असलेलं राज्य!  केरळ एक तर राजकीय किंवा धार्मिक कारणांनी  होणाऱ्या हत्त्येसाठी नेहमी चर्चेत असतो, सध्या केरळ  जलप्रलयच्या बातम्यांनी चर्चेत आहे.
‌              केरळ हे पश्चिम घाटावर येणार राज्य, नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध त्यामुळे साहजिकच 'खाण' आणि 'पर्यटन' व्यवसायांचा मोठयाप्रमाणावर विकास झाला  आणि याच्यातूनच केरळ सरकारला मोठयाप्रमाणावर उत्पन्न मिळत आहे. त्यातच ह्या केरळसरकारने जैवविविधतेने समृद्ध असल्याने तसेच पर्यटनस्थळांचा विकास याच्यातून अनेक नवीन कृत्रिम बंधारे विकसित केले नि नवीन पर्यटनस्थळे विकसित केले.तसेच हे राज्य नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असल्याने 'खाण'विकास आणि उत्खनन हि या राज्यामध्ये मोठ्याप्रमाणावर झाल.     
‌                पश्चिमघाटवरील पर्यावरणाचा  अभ्यासकरण्यासाठी केंद्रसरकारने पर्यावरणतज्ज्ञ
‌   माधवराव गाडगीळांच्या नेतृत्त्वाखाली  एक
‌ समिती गठित केली आणि गाडगीळ समितीने विकास  नि खाण उत्खननामुळे   केरळमध्ये मोठ्याप्रमाणावर पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे नि केरळ मधील  भाग 'पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील' आहे  असा अभ्यासाअंती निर्णय दिला.

‌गाडगीळ समितीचा निर्णय सौम्य करण्यासाठी
‌ दुसरी समिती गठित करण्यात आली. त्यानुसार त्यांनी  हा गाडगीळ समितीचा निर्णय सौम्य केला नि उत्खनन चालूच ठेवले.
‌           आज आपण पाहत आहेच की  शंभर वर्षामध्ये पडला नाही एवढा पाऊस केरळमध्ये झाला. नाले तुंबून वाहू लागली. पावसाच्या पाण्याचा निचरा झाला नाही;गावच्या गावे पाण्याखाली फस्त झाली, नि मोठयाप्रमाणावर जीवित नि वित्तहानी झाली. लाखोंच्या लाखो बेघर झाली . आज १५ दिवस झाले हे चिंचोळे राज्य प्रलयंकारी पुरास तोंड देत आहे.
             
                                    ✍🏻अजय बस्ताळ

Comments

Popular posts from this blog

खरचं, मी पर्यावरणवादी?

                 खरचं, मी पर्यावरणवादी?                     जेव्हा गांधीजींचा एक प्रसंग माझ्या वाचनामध्ये आला.जेव्हा गांधीजी  प्रयाग येथील काँग्रेसच्या संमेलनामध्ये असताना पाण्याने हात धुत होते, तेव्हा कार्यकर्त्यांबरोबर बोलण्यात गर्क झाल्याने जास्त पाणी हातावर ओतले गेले. ते जरी अनवधानाने घडले असले तरी जास्त पाणी वाया गेल्याचे त्यांना वाईट वाटू लागले .तेवढ्यात जवाहरलालजी म्हणाले,"आपण तर गंगा-यमुनेच्या काठावर आहोत आणि पाण्याची काय कमतरता आहे.थोडे जास्त पाणी वाया गेले म्हणून कुठं बिघडलं? म.गांधीजी म्हणाले कि ,"गंगेचे पाणी सर्वांसाठी आहे, पशू,पाखरे, कीटक.. माझ्याकडून  अनवधानाने जरी जास्त पाणी वाया गेले असले तरी  मी कोणाच्या तरी वाटचा हिस्सा हिसकवला  आहे. या प्रसंगातून मला एक जाणवलं कि, आपण सकाळ पासून किती पाणी वाया घालवत असतो. शौचालयाला गेलो तरी कमीतकमी लहान दोन बादली पाणी वापरतो. तसेच स्नानासाठी गेल्यावर कमीत कमी तीन  मोठी बादली पाणी वापरतो. शौचालयातील फ्लशचा आणि स्नानगृ...

काय आहेत CAA आणि NRC?? का एवढे गैरसमज पसरवले जातं आहेत??

                आज देशभर CAA(Citizenship Amendment Act) च्या नावाने गोंधळ माजवला जात आहे. तर काय आहे हा नागरिकत्व दुरुस्ती कायदा!! काही दिवसांपूर्वी हे (Citizenship Amendment Bill) विधेयक  लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बहुमताने पारित झालं. तद्नंतर 12 डिसेंबर 2019 ला राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने ह्या विधेयकाला मंजुरी मिळाली आणि पक्कं झालं कि, हा कायदा आता लागू होणार तेव्हा पासून देशामध्ये  वेगवेगळ्या  काँग्रेस च्या नेत्यांनी जाहीर भाषणे केली. हा कायदा देशामध्ये तुष्टीकरण करत आहे . तसेच हा कायदा विशिष्ट एका धर्माच्या विरुद्ध आहे असं वातावरण काँग्रेस, कम्युनिस्ट,TMC MIM, तसेच वेगवेगळ्या डाव्या विचाराच्या  विद्यार्थी संघटनांनी  इ. वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली. भारतीय नागरिकांना तळागाळापर्यंत समजेपर्यंत  खूप गैरसमज देशभर हेतुपुरस्सर  जाणूनबुजून पसरवले गेले.          त्यामुळे देशभर  आंदोलनाला हिंसक वळण मिळालं. हे हिंसक आंदोलन   लवकरच आसाम, पश्चिम बंगाल  आणि तसेच देशातील क...

हिंदू, हिंदुत्व, हिंदुराष्ट्र

स्वा. सावरकरांच्या व्याख्येनुसार जो या देशाला भूमीला पुण्यभूमी आणि पितृभूमी मानतो तो हिंदू! सावरकारांच्या व्याख्येनुसार, तर जो जो या देशांमध्ये राहतो मग तो कोणत्याही संप्रदायाचा असो(इस्लाम, ख्रिश्चन, ज्यू, पारसी) या देशाला पुण्यभूमी आणि पितृभूमी मानत असतील तर तेे सर्व हिंदू आहेत.या देशाला वेगवेगळी नाव आहेत भारत,इंडिया, हिंदुस्थान असे. राजा दुष्यांत आणि शकुंतला चे पुत्र भरत नावाचा पराक्रमी राजा होऊन गेला त्यांच्यावरून नावावरून या भूमीला 'भारत 'असे नाव पडले. इंडस(सिंधू खोरे) याच्या वरून या भूमीला 'इंडिया' असे पाश्चातानी नाव दिले.आता राहिला विषय जो नेहमी हिंदू ह्या शब्दांची उत्पत्ती कशी झाली... याचा उल्लेख तर वेद, उपनिषदामध्ये तर नाही मग याचा उगम कसा झाला तर जेव्हा इराणी लोक वायव्ये कडून भारतामध्ये व्यापाराच्या निमित्त येत असत तेव्हा त्यांनी सिंधूचा उल्लेख हिंदू  असा  करत कारण इराणी(पारसी )भाषेमध्ये 'स' चा उच्चार 'ह' असा होतो. इराणी लोक सिंधू नदीच्या खोऱ्यात बहरलेल्या सिंधू संस्कृतीला हिंदू संस्कृती म्हणत.इराणींकडून हे नाव अरबांकडे पोहचले असे हे नाव जग...