Skip to main content

Posts

Showing posts from January, 2019

शहरी नक्षलवाद

           प.बंगालमधील नक्षलबाडी   येथून चालू झालेली जमीनदारांच्या विरोधातील हि चळवळ आज भारतातील मोठ्यामोठ्या शहरांच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या रूपांमध्ये पोहचली आहे. प्रथमतः  मुझुमदार, सन्याल यांनी ही चळवळ भूदास, शेतमजूर यांच्यासाठी जमीनदाराच्या विरुद्ध सशस्त्र क्रांतीचा  मार्ग अवलंबला. सुरूवातीला हि चळवळ जमीनदारांच्या जमीनी बळकावून भूदास,शेतमजूर, शोषित यांच्या मध्ये वाटण्यात आली  आणि नक्षलवादी चळवळ काही अंशी यशस्वी झाली. नंतर हि खूप प्रसिद्ध झाली याच्यातूनच आदिवासी, भूदास, शेतमजूर, शोषित , वंचित असे समाजातील वेगवेगळे गटातील लोक नक्षलवादी चळवळीला जोडत गेले. हि चळवळ झपाट्याने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचली.  जंगल, जमीन,जल याच्या साठी आपण लढत आहोत असे नक्षलवादी नेतृत्वाने बिंबवण्यास सुरुवात केली.याच्यातूनच मग विकासाला विरोध, राजकीय लोकांची हत्या, प्रशासनाच्या कामांमध्ये अडथळे निर्माण करण्यासारखे गोष्टी घडू लागले, पोलीस दलावर गोळीबार करणे असे सातत्याने घडू लागले. हि चळवळ अशाप्रकारे पश्चिम बंगाल, झारखंड,मध्यप्रदेश, छत्तीसगढ, महाराष्...

काश्मिर प्रश्न

         ज्या भूमीला प्राचीन काळापासून पृथ्वीवरील स्वर्ग म्हणायचे त्याला आता नरकात रूपांतर करण्यामध्ये  पाकिस्तान, दहशतवादी, अलगाववादी , हुर्रियत नेत्यांनी कोणतीही  कसर ठेवली नाही; तसेच कट्टर जिहादी गटाने त्याला धार्मिक स्वरूप देवून त्या विषयाला  धगधगत ठेवण्यामध्ये  यांचा प्रामुख्याने हात आहे.            काश्मिरचा विषय नेहमी कोणत्या ना कोणत्या विषयामुळे  चर्चेत असतो. मग तो सामाजिक, राजकीय,   भौगोलिक,धार्मिक असो किंवा दहशतवादी  ह्या विषयामुळे काश्मिरचा प्रश्न  नेहमी धगधगत असतो.  हा प्रश्न प्रामुख्याने निर्माण झाला तो स्वातंत्रोत्तर भारतानंतर, ज्यावेळेस ब्रिटिशांनी भारतातील संस्थानिकांना  एक तर तुम्ही भारत किंवा पाकिस्तानमध्ये विलीन व्हा किंवा  किंवा स्वतंत्र रहा असे सुचवले. ह्या ब्रिटिशांच्या निर्णयानंतर काश्मीरच्या राजा हरिसिंग ने काश्मीर संस्थानिक स्वतंत्र ठेवण्याचा निर्णय घेतला;त्याप्रमाणे काश्मीर राज्य स्वतंत्र राहीले .तिथे राजा हिंदू तर बहुसंख्याक जनता मुस्लिम होती, तसेच...