Skip to main content

Posts

Showing posts from September, 2018

इतिहासाचे डावे वळण

जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय मधील इतिहास संशोधन केंद्राचे अध्यक्ष तसेच दिवंगत  प्राध्यापक बिपीन चंद्र यांचे ' आधुनिक भारत का इतिहास' या पुस्तकामध्ये  क्रांतिकारकांना, आतंकवादी असा शब्दप्रयोग केला आहे. तसेच   महात्मा गांधीजींची हत्या करणाऱ्यांचा हिंदू कट्टरपंथी असा उल्लेख केला आहे. अबुल कलाम आझाद राष्ट्रवादी तर भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त मात्र आतंकवादी  असा पक्षपाती शब्दप्रयोग का? हे पुस्तक साधसुधं नाही , या पुस्तकाचा उपयोग संघ लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व अखिल भारतीय सेवांच्या परीक्षेचा  अभ्यास करणारे जवळजवळ सर्व विद्यार्थी ह्या पुस्तकाचा उपयोग पाठ्यपुस्तकासारखा करतात. हे पुस्तक लोकशाहीमधील महत्त्वाचा स्तंभ समजला जाणारा नोकरशाही मधील जबाबदारीच्या व्यक्तींचा बौद्धिक खुराक आहे. थोडा विचार करण्यासारखा आहे!!!

केरळची आपत्ती नैसर्गिक की मानवनिर्मित?

‌           समुद्र आणि जंगल यांच्या मध्ये असलेलं चिंचोळ राज्य म्हणजे 'केरळ'. दक्षिणेकडील राज्यांपैकी एक राज्य,  हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन अशी संमिश्र धार्मिक  लोकजीवन  प्रणाली असलेलं राज्य!  केरळ एक तर राजकीय किंवा धार्मिक कारणांनी  होणाऱ्या हत्त्येसाठी नेहमी चर्चेत असतो, सध्या केरळ  जलप्रलयच्या बातम्यांनी चर्चेत आहे. ‌              केरळ हे पश्चिम घाटावर येणार राज्य, नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध त्यामुळे साहजिकच 'खाण' आणि 'पर्यटन' व्यवसायांचा मोठयाप्रमाणावर विकास झाला  आणि याच्यातूनच केरळ सरकारला मोठयाप्रमाणावर उत्पन्न मिळत आहे. त्यातच ह्या केरळसरकारने जैवविविधतेने समृद्ध असल्याने तसेच पर्यटनस्थळांचा विकास याच्यातून अनेक नवीन कृत्रिम बंधारे विकसित केले नि नवीन पर्यटनस्थळे विकसित केले.तसेच हे राज्य नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असल्याने 'खाण'विकास आणि उत्खनन हि या राज्यामध्ये मोठ्याप्रमाणावर झाल.      ‌                पश्चिमघाटवरील...